Thursday, 18 July 2013
अश्मयुग
मानवाच्या उत्क्रांतीत मानवाने त्याच्या सर्वत्र पसरलेल्या अश्माचा तंत्रज्ञान म्हणुन उपयोग केला. यानंतर अखेरीस शेतीचा विकास, माणसाळलेले प्राणी पाळले व तांब्याची निर्मिती होईल अशा मातीचा शोध लावला.
या अश्मयुगात फार मोठया प्रमाणावर हवामानाचा व अन्य गोष्टींचा बदल होत गेला, आणि त्याचा परीणाम मानवाच्या उत्क्रांतीवर झाला, आणि काळाबरोबर मानवाने शिकारी साठी कुत्रे सोबत घेतले,
शेतीची सुरुवात :
पर्यावरणाच्या बदलामुळे मानवाला नविन अन्नाची गरज भासु लागली.
अश्म युगाचा उत्तरार्ध :
अश्मयुगाच्या उत्तरार्धात शेतीला खर्या अर्थाने सुरुवात केली, त्याला अश्मयुग उत्तरार्ध क्रांती असे म्हणतात. या नंतर यात मांतीची भांडी व अन्य साहित्य बनविण्याचा विकास करण्यात आला. अश्मयुगातील उत्तरार्ध संस्कृतीची सुरुवात ख्रिस्तपुर्व ८००० मध्ये झाली. पिकावर प्रकि्रया व ते वाहुन नेण्याची गरज मानवाला भासु लागली. यात भरडणे, तासणे, तोडणे, कापणे याला लागणार्या साहित्याचा समावेश करण्यात आला.
अन्न आणि पेय :
अश्म युगात मानव हा अन्न म्हणुन प्राण्यांचे अवयव खात असे, त्यात मांस, यकृत, मुत्रपिंड, मेंदु यांचा समावेश होता, १८००० ते ९००० या काळात आशिया, उत्तर अमेरीका, ऑस्ट्रेलिया व युरोप येथे मोठया प्रमाणावर सस्तन प्राण्यांचा नाश झाला.
राष्ट्रीय भौगोलिक आशयानुसार मानवाने अश्मयुगाच्या उत्तरार्धात जंगली द्राक्षापासुन पहिले मद्य बनविले. ते मद्य हे प्राण्यांच्या कातडीत किंवा लाकडापासुन ओबडधोबड बनविलेल्या कपात पित असत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
खुप छान
ReplyDelete